ही सरस्वती आणि शतुद्रीच्या दुआबातील भूमी अत्यंत पवित्र भूमी म्हणून ओळखली गेली पाहिजे. यापुढे इथे जरी युध्द झालं तरी एकतर ते महान लोकांंधील युध्द असेल अन्यथा धर्मासाठीचं युध्द असेल. इथल्या भूमीला चंद्रवंशी नृपतींच्या नावेच ओळखलं गेलं पाहिजे - ययाती हे राजन, पुरूचं तप्त ब्रह्मचर्य आणि तुझ्याकडून घडणारा निष्काम कामभोग यामुळे हा तुझा चंद्रवंश पावन होणार आहे. तुझ्याच वंशात गोपालक श्रीनारायण येतील. तुझ्याच वंशात युगंधर नृपती येतील. ते वसिष्ठ -भरद्वाजांची प्रतिष्ठा मिळवतील. तुझाच वंशज नारायणाला प्रतिज्ञा मोडायला लावेल आणि आर्यावर्ताला समग्र राजधर्म देऊन जाईल. तुझा एक वंशज नारायण असेल आणि त्याच्याकडून रणभूमीवर उपनिषदांचे सार सांगितले जाईल. - महर्षी अत्री महर्षी अत्रींपासून चंद्रंवश सुरू होतो. पुरूरवा, ययाती, दुष्यंत आणि भरत या चंद्रवंशी राजांच्या स्वभाववृत्तीचं चित्रण करणारी कादंबरी.