कळ आतल्या जीवाची,
चिरदाह वेदनेचा मज शाप हाच आहे.”
तुम्ही गेलात... पण
आठवणी थांबल्या नाहीत.
विरहातही तुमच्या प्रेमाचं
सामर्थ्य कमी झालं नाही.
कारण, तुम्ही माझ्या आठवणीत आहात,
स्वप्नात आहात, दुःखात आहात,
आनंदातही आहात.
फक्त, तुम्ही मला दिसत नाहीत.
तरीसुद्धा प्रत्येक क्षणी,
आठवणीच्या रूपात
तुम्ही माझ्याजवळ आहात.
असा एकही दिवस नाही,
की तुमची आठवण येत नाही.
डोळ्यात पाणी येत नाही.
कधी कधी असं वाटतं,
हे सगळं एक स्वप्न असावं,
आणि मी स्वप्नातून जागी होऊन,
तुम्ही मला हाक मारावी.
जगण्यासाठी फक्त
तुमचं असणं गरजेचं होतं,
पण तेही माझ्या नशिबात नव्हतं...