'संध्याछाया' ही जयवंत दळवी यांची मराठीतील एक लक्षणीय नाट्यकृती. जिथे म्हातारपणातील तक्रारी आहेत, एकमेकांविषयी ओढ आहे आणि दूर असलेला मुलगा कधीना कधी परत येईल अशी आस आहे. नीरस आणि निरर्थक ठरणाऱ्या जीवनाच्या जीवघेण्या आणि साचलेपणाचं नाट्यात्म दर्शन घडवणं आणि ती टिकवून ठेवण्याचं दळवींचं कसब त्यांच्या सर्व कलाविष्कारातून पाहायला मिळतं. ऐका, जयवंत दळवीलिखित नाटक 'संध्याछाया' मोहन जोशी, ज्योती चांदेकर, प्रमोद पवार आणि चिन्मय पाटसकर यांच्यासह.
Szórakoztató és szépirodalom