राजू फातरफेकर हा एक महाविद्यालयीन तरूण. त्याला हिरो बनावं असं वाटत असतं. त्याला ते जमत नसतं. मुलींशी बोलावं असं त्याला वाटतं पण तेही त्याला जमत नसतं. मग एक चमत्कार होतो. त्याच्या आयुष्यात तीन तीन मुली येतात. त्याची नखं खायची सवय जाते. तो धडाक्याने हिरोतर बनतो पण त्यानंतर त्याच्या आयुष्यातून आलेल्या तिघीही एक एक करून कटतात. कुणाच लग्न होतं, कुणाच्या पत्रिकेत मंगळ असतो. राजूला त्याच्या क्रीडा कौशल्यामुळे मुंबईत नोकरी मिळत असते म्हणून आईला त्याच्या लग्नाची घाई असते. मग काय घडत ? हे गीता रहस्य सोडवण्यासाठी 'स्वप्नरंजन' करायलाच हवं.