सर्व देवतांमध्ये हनुमान देखील एक शक्तिशाली व बुद्धिमान देवता आहे. हिंदू धर्मामध्ये विविध येणाऱ्या संकटांपासून हनुमान मुक्ती देतो, असे हिंदू लोकांचे मानणे आहे. हनुमानाने केवळ रामायणातच नाही, तर महाभारतात देखील अर्जुनाच्या रथाची रक्षा केलेली आपल्याला महाभारतातील लेखात कळते. त्यानंतर कलियुगातही हनुमान संकटांपासून पृथ्वीचे तसेच मानवी जीवनाचे रक्षण करतो, असे हिंदू लोकांचे मानणे आहे.